Thursday 6 November 2014

शनीची साडेसाती (Sadesati)

शनीची साडेसाती

1.  शनीची साडेसाती सर्वांनाच केव्हा ना केव्हा भोगावीच लागते. शनिची साडेसाती हा असाच खडतर कसोटीचा आविष्कार आहे. सारे आलबेल असणे हे समाधानकारक खरेच. परंतु,तेव्हा एकप्रकारची सुखासीनता, निष्क्रियपणा येण्याचा धोका असतो. सोने जसे भट्टीत घातल्यानंतरच लखलखते तद्वतच शनिच्या साडेसातीचा काळ हा उद्याच्या तेजापूर्वीची पहाट असते असे समजून साडेसातीला खुल्या दिलाने सामोरे जावे.

2.  फलज्योतिषात शनीला असाधारण महत्त्व आहे. शनीची साडेसाती ही फलज्योतिषातील प्रसिद्ध कल्पना आहे. प्रत्येक राशीच्या व्यक्तीला तीस वर्षांनंतर एकदा साडेसाती येते ह्याचे कारण शनी संपूर्ण गोलाकार (३६० अंश) प्रदक्षिणा करायला अंदाजे ३० वर्षे (मार्गी-वक्री) घेतो. १२ राशींच्या या प्रवासाला ही ३० वर्षे लागतात. अर्थात प्रत्येक राशीला तो साधारणपणे अडीच वर्ष असतो, शनी ज्या राशीला असेल त्या राशीला तसेच तिच्या मागच्या व तिच्या पुढच्या राशीला अशा एकंदर तीन राशींना त्या त्या वेळी साडेसाती आहे असे मानतात. तीन राशीतील संक्रमणाला शनिला साडेसात वर्षांचा कालखंड लागत असल्याने शनिच्या या कालखंडाला साडेसाती हे पीडा देण्याचे प्रतीक असल्यासारखे नाव मिळाले आहे.

३.  मिनी साडेसाती : याशिवाय ज्याला छोटी/मिनी साडेसाती म्हणतात ती शनी ज्या राशीपासून चवथ्या व आठव्या स्थानी असलेल्या राशींना असते. मिनी साडेसातीला छोटी पनवती/ढैया असेही म्हणतात.

४.  दि. २ नोव्हेंबर २०१४ रात्री ९ वा. १० मिनिटांनी शनी वृश्‍चिक राशीत प्रवेश करतो आहे.त्यामुळे शनिची साडेसाती तूळ, वृश्‍चिक व धनु राशींना असनू मिनी साडेसाती मेष आणि सिंह राशींना आहे. दि. २६ ऑक्टोबर २०१७ पर्यंत शनी वृश्‍चिक राशीत राहणार असून,नंतर तो धनु राशीतून भ्रमण करणार आहे.

 राशीनिहाय साडेसातीची फळे खालीलप्रमाणे:

मेष- आर्थिक अडचणी निर्माण होतील, आरोग्य बिघडेल.
वृषभ- वैवाहिक असमाधान, मनस्ताप.
मिथुन- व्यवसायात वाढ, तीर्थयात्रा.
कर्क- संततीची चिंता, शेअर्समध्ये तोटा.
सिंह- दु:खदायक काळ, घरामध्ये कलह.
कन्या- प्रत्येक कार्यात यश.
तूळ- नेत्रपीडा, पैशाचा नाश.
वृश्‍चिक- मानसिक अस्वस्थता.
धनु- निरर्थक त्रास, मनस्ताप.
मकर- भरभराटीचा काळ.
कुंभ- नवीन कार्यारंभ होतील, आरोग्य सुधारेल.
मीन- आर्थिक लाभ पण मानहानी.


.  प्रत्येक कुंडलीमध्ये १२ स्थांनांपैकी एका स्थानात चंद्र असतो. शनि हा भ्रमण करता करता या स्थानाच्या आदल्या स्थानात आला की त्या जातकाची साडेसाती सुरु होते आणि चंद्राच्या दुसर्‍या स्थानामधून शनि निघून जाईपर्यंत ती चालू रहाते. म्हणजे माझ्या कुंडलीत जर चंद्र १ ल्या घरात पडला असेल, तर १२ वा घरात शनि आला की माझी साडेसाती चालू होणार आणि २ र्‍या घरातून शनि बाहेर पडेपर्यंत ती चालू रहाणार. प्रत्येक राशीत अडीच वर्षे वास्तव्य करत असल्यामुळे शनिस ही एकूण ३ घरे पादाक्रांत करण्यासाठी साडेसात वर्षे लागतात म्हणून नाव साडेसाती.

. शनीला एक राशी भोगण्यास अडीच वर्ष लागतात. अर्थात तीन राशी भोगण्यास साडेसात वर्षे लागतात...म्हणजे समजा तुमची राशी सिंह आहे.त्याच्या आधीची राशी आहे कर्क.म्हणजेच जर शनिने सिंह राशीत प्रवेश केला तर कर्क, सिंह आणि कन्या ह्या तिन्ही राशीना साडेसाती सुरु झाली. त्यामुळे या घटनेला साडेसाती हे नाव पडले आहे.

.  जन्मपत्रीकेतील मूळ चंद्रराशीच्या मागे व पुढे शनि असे पर्यंत साडेसाती समजली जाते. उदा. - एखाद्या जातकाची चंद्ररास तूळ असेल तर शनि ने कन्या राशित प्रवेश केल्यापासून ते वृश्चिक राशितून पुढे जाई पर्यंत साडेसाती सुरु होते .

.  जेव्हा चंद्राचे मागील राशितील शनिचे भ्रमण सुरु होते तो साडेसातीचा पूर्वार्ध होय. जन्मस्थ चंद्रावरून शनि भ्रमण करतो त्याला मध्यकाळ, तर चंद्राचे पुढील राशितून शनि जातो त्या वेळेस अंतकाळ वा उत्तरार्ध म्हणतात.

.  शनीच्या साडेसातीची प्रत्येकाला भीती वाटते.प्रत्येकाला वाटते की त्याच्या /तिच्या आयुष्यात कधी साडेसाती येउ नये. पण साडेसाती कोणालाच टळलेली नाही. प्रत्येक राशीला साडेसाती ही असतेच. साडेसाती या शब्दाचे सुद्धा मनुष्य घाबरून जातो. आपल्याला साडेसातीत काय अशुभ गोष्टी घडतील या विचाराने मनुष्य गर्भगळीत होतो. साडेसाती म्हणजे सर्वार्थाने चांगल्या माणसाची सत्वपरीक्षा तर तुमच्या आजपर्यंत केलेल्या प्रत्येक वाईट कृत्यासाठी शासन मिळवण्याचा काळ असतो. सर्वासाठी 'विलंब' हा महत्वाचा अनुभव मात्र येतच असतो.

१०.  शनीची साडेसाती ही इष्टापती - 

पायरी न ओळखता अविचाराने वागून बेभान वागणाऱ्या व्यक्तींना वठणीवर आणण्यासाठी साडेसाती हा रामबाण उपाय होय. आत्मपरीक्षण करण्याची समज नसलेल्यांना सुधारण्याचे, माणुसकीत आणण्याचे कार्य श्री शनिदेव करतो ते फक्त साडेसातीच्या माध्यमातून, म्हणून उच्च विचार केला असता साडेसाती ही एक इष्टापतीच होय. साडेसातीच्या काळात दिसून येणारा अनुभव म्हणजे स्वताच्या बाबतीत सर्वच प्रतिकूल दिसणे किंवा असणे . उदा :- कुठल्याही कामात अपयश , चूक नसताना त्रास भोगावा लागणे, दोस्त मंडळीकडून विश्वासघात, आर्थिक नुकसान, कौंटुबिक कलह वाढणे, मनाविरुद्धच्या घटना भाऊबंदकीचे प्रसंग उत्पन्न होणे, बुडीत जाणे , कोर्ट कचेऱ्यांचे सापडणे, चिवट दुखणी सुरु होणे, मानहानी वा मानसिक अत्याचार सहन करावे लागणे हे प्रकार अनुभवास येतात. साडेसाती हा भोग आहे, तो भोगूनच संपविला पाहिजे.


११. सर्व प्रथम साडेसाती म्हणजे काय ते समजुन घेउया. शनि हा ग्रह एका राशीला साडेसात वर्ष त्रास देतो. म्हणून त्याला साडेसाती असे म्हणतात. शनि हा ग्रह वाईट ग्रह आहे असे अनेकांना वाटते. आणि तो आपल्या राशीत आल्यावर आपले वाईट करतो. असे सर्वांनाच वाटते. इतर ग्रहांप्रमाणे शनी देखील आकाशमंडळात भ्रमण करत असतो. याकाळात तो प्रत्येक राशीत साधारण 2.5 (अडीच) वर्षे असतो. याकाळात ज्या व्यक्तीची ती चंद्र राशी असेल (जन्म पत्रीकेत चंद्र ज्या राशीत आहे ती राशी), त्या व्यक्तीला साडेसाती सुरु आहे असे म्हणतात.

१२. आता एक प्रश्न असा उभा राहतो की शनी लग्न राशीत असल्यावर साडेसाती का        नसते ?तो चंद्र राशीत असल्यावरच का असते ?


या प्रश्नाचे उत्तर समजले की साडेसातीत काय होते ते  समजते या साठी आता आपण प्रथम चंद्राचे कारकत्व समजुन घेउया. चंद्र हा मनाचा कारक ग्रह आहे. आपण जो विचार करतो, स्वप्न बघतो, कल्पना-रंजन करतो ते सर्व चंद्राच्या अधिपत्याखाली येते.

१३. आता साडेसाती मध्ये काय होते ते समजुन घेउया.साडेसाती मध्ये शनीचा संबंध तुमच्या चंद्र राशीशी म्हणजेच तुमच्या मनाशी येतो. चंन्द्र हा मनाचा कारक असल्यामुळे शनि या पापग्रहामुळे साडेसाती असलेल्या जातकाची मानसिक स्थिती खराब होते.मनावर नियंत्रण राहत नाही. या कालात जातकाला आर्थिक ,मानसिक आणि अपघात होणे अशा स्वरुपाचा खुप त्रास होतो.
माणसाचे गर्वहरण,अहंकार नष्ट करुन त्याला वठणीवर आणायच काम शनि करतो.


१४. सर्वसाधारणपणे मेष,सिह,धनु या अग्निराशींना व कर्क,वॄश्चिक,मीन या जलराशीं मध्ये चंन्द्र असलेल्या जातकांना साडेसाती जास्त त्रास होतो.



१५.शनीची साडेसाती असतांना तुम्ही खालील नियम पाळले तर याचा त्रास होत नाही.

1. साडेसातीत हनुमान या वायु देवतेची उपासना करण्यास सांगितली गेले आहे. साडेसातीत हनुमान चालिसा वाचावी.

2.आपल्या कुलदेवतांची उपासना नित्यनेमाने रोज करण्या इतका चांगला उपाय कोणताही नसेल. ते एक सं‍रक्षक कवच असते.

3.दररोज गणेश स्रोत्राचे वाचन करून गणेश दर्शन घ्यावे व नीतीने वागावे, म्हणजे त्रास कमी होतो.
4. शनिवारी उडीद, तेल, तीळाचे तेल व रूईच्या पानांचा हार शनिमहाराजांना घालावा. शनिवार उपवास करावा व शनि चालीसा वाचणे.
5. कोणालाही खोटी आश्वासने देण्याचे टाळा. वाईट प्रवृतींपासून दुर रहावे.
6. उद्या होणार्‍या कामावर आज कोणालाही शब्द देण्याचे टाळा. जेव्हा प्रत्यक्ष हातात काही येईल तेव्हाच दुसर्‍याला शब्द द्या.
7. तुम्ही जे कार्य योजीले आहे त्या विषयी, त्या संबंधित व्यक्तींशीच चर्चा करा. इतरांशी त्याविषयी काहीही बोलायचे टाळा.

8. खोटे बोलायचे टाळा व इतरांच्या स्वत:संबंधीच्या अपेक्षा उंचावु नका.
9. वरील बर्‍याच गोष्टी रोजच्या जीवनात आचरनात आणणे कठीण असल्यामुळे, शक्यतो जास्त बोलण्याचेच टाळा.
वरील नियमांचे पालन केल्यास त्रास होणार नाही.


राशीनिहाय साडेसाती  खालीलप्रमाणे:

1) मेष : ज्यांची मेष राशी असेल त्यांना मीन राशीत शनी आल्याबरोबर साडेसाती सुरू होते. तेव्हा पहिली अडीच वर्षे व शेवटची अडीच वर्षे चांगली जातात. परंतु मेष राशीत शनी आला म्हणजे मधली अडीच वर्षे अनिष्ट जातात.

2) वृषभ : ज्यांची वृषभ राशी आहे त्यांना मेष राशीत शनी आला की साडेसाती पुन्हा सुरू होते व पहिलीच अडीच वर्षे अनिष्ट जातात. पुढील पाच वर्षे त्रासदायक जात नाहीत.

3) मिथुन : यांची मिथुन राशी आहे त्यांना वृषभ राशीत शनी आला की साडेसाती सुरू होते. पहिली पाच वर्षे चांगली जातात. परंतु शेवटची अडीच वर्षे त्रासदायक जातात.

4) कर्क : ज्यांची कर्क राशी आहे त्यांना शनी मिथुन राशीत आला की साडेसाती सुरू होते. पहिली अडीच वर्षे चांगली जातात. परंतु शेवटची अडीच वर्षे त्रासदायक जातात.

5) सिंह : ज्यांची सिंह राशी आहे त्यांना शनी कर्क राशीत आला की साडेसाती सुरू होते. पहिली अडीच वर्षे चांगली जातात. परंतु शेवटची अडीच वर्षे त्रासदायक जातात.

6) कन्या : ज्यांची कन्या राशी आहे त्यांना शनी सिंह राशीत आला की साडेसाती सुरू होते. पहिली अडीच वर्षे त्रासदायक जातात. परंतु शेवटची अडीच वर्षे चांगली जातात.

7) तूळ : ज्यांची तूळ राशी आहे त्यांना शनी कन्या राशीत आला की साडेसाती सुरू होते. पहिली अडीच वर्षे चांगली जातात. परंतु शेवटची अडीच वर्षे त्रासदायक जातात.

8) वृश्चिक : ज्यांची वृश्चिक राशी आहे त्यांना शनी तूळ राशीत आला की साडेसाती सुरू होते. पहिली अडीच वर्षे चांगली जातात. मधली अडीच वर्षे त्रासदायक जातात.

 9) धनू : ज्यांची धनू राशी आहे त्यांना शनी वृश्चिक राशीत आला की साडेसाती सुरू होते. पहिली अडीच वर्षे त्रासदायक जातात. शेवटची पाच वर्षे चांगली जातात.

10) मकर : ज्यांची मकर राशी आहे त्यांना शनी धनू राशीत आला की साडेसाती सुरू होते. संपूर्ण साडेसात वर्षे चांगली जातात.

11) कुंभ : ज्यांची कुंभ राशी आहे त्यांना शनी मकर राशीत आला की साडेसाती सुरू होते. संपूर्ण साडेसात वर्षे चांगली जातात.

12) मीन : ज्यांची मीन राशी आहे त्यांना शनी कुंभ राशीत आला की साडेसाती सुरू होते. पहिली पाच वर्षे चांगली जातात. शेवटची अडीच वर्षे त्रासदायक जातात.

शनीची चांगली फळे केव्हा मिळतात?

जन्मराशीपासून दुसरा, सहावा, दहावा,अकरावा शनी गोचरीने आला म्हणजे त्याची चांगली फळे अनुभवास येतात.

 विद्यार्थ्यांस परीक्षेत यश मिळते. उद्योगधंद्याची भरभराट होते. नोकरीत बढती मिळते. अधिकार मिळतात. पराक्रम आणि ऐश्वर्याची प्राप्ती होते. समाजात मानसन्मान मिळतो. सगळ्या गोष्टी चांगल्या घडतात. घरात मंगलकार्ये घडतात. तिसरा शनी आला म्हणजे द्रव्यलाभ होतो. वादविवादात यश मिळते. अशा शनीत काही गोष्टी अनिष्टही घडतात. उदाहरणार्थ पराक्रमाला चांगला असला तरी संततीविषयी त्रासदायक गोष्टी घडतात. द्रव्याचा खर्च फार होतो. आजारपणात काळ जातो. मनाला त्रासदायक गोष्टी अशाच वेळी घडतात








Wednesday 5 November 2014

हस्ताक्षर आणि स्वभाव(Your handwriting and your nature)

हस्ताक्षर आणि स्वभाव
१.मनुष्य हा मुळातच जिज्ञासू प्राणी आहे. निसर्गातील अनेक अनाकलनीय घटनांचा अर्थ लावणारा माणूस स्वत:चे भविष्य जाणून घेण्यासाठी खूप उत्सुक असतो. त्यामुळे त्याला प्रत्येक गोष्ट जाणून घेण्यात रस आहे. त्याला अनेक प्रश्न पडतात. त्याची उत्तरे शोधण्यासाठी तो जंग जंग पछाडतो. अनेक गोष्टींचा शोध घेतो. सापडलेल्या गोष्टींचे अर्थ लावण्याचा प्रयत्न करतो. माणसाच्या जिज्ञासूपणातून अनेक शास्त्रे विकसित होत गेली.  ग्राफोलॉजी (हस्ताक्षरावरून स्वभाव ओळखण्याचे एक शास्त्र ) हे याचं उत्तम उदाहरण आहे. हस्ताक्षराचा विश्लेषणात्मक, शास्त्रोक्त अभ्यास म्हणजेच ग्राफोलॉजी होय. हस्ताक्षर अभ्यासण्याचे काही खास नियम आणि पद्धती आहेत. या नियम आणि पद्धतींचा अभ्यास करून मानवी स्वभावांचा अभ्यास केला जातो.
२.माणसाचा स्वभाव हे एक अजब रसायन आहे. त्याचा संपूर्ण थांग आजपर्यंत कुणालाही लागलेला नाही. आरशात जसे तुमच्या शरीराचे प्रतिबिंब दिसते, तसे तुमच्या अक्षरातून तुमच्या व्यक्तिमत्वाचे प्रतिबिंब पाहता येते. ग्राफोलॉजीव्दारे अक्षराचे आणि आपल्या सहीचे विश्लेषण केले जाते. हस्ताक्षर तपासल्यावर खूप काही नवीन गोष्टी कळू शकतात, कळतात!
३. हस्ताक्षराद्वारे मनोविश्लेषण करणे हे मानसशात्र व हस्ताक्षर यांच्याशी संबंधीत एक शास्त्र आहे. सोप्या शब्दात आपले, आपल्या व्यक्तिमत्त्वाचे, चारित्र्याचे,मनोवृत्तीचे, जीवनाकडे बघण्याच्या आपल्या दृष्टिकोनाचे व अशा विविध गोष्टींचे विश्लेषण आपल्या हस्ताक्षराद्वारे होते. आपले हस्ताक्षर, आपली सही खऱ्या अर्थाने शाईच्या माध्यमातून कागदावर उतरलेले आपण असतो.
४.ग्रॅफोलॉजी आपल्या  हस्ताक्षराचे विश्लेषण करुन आपले चारित्र्य, आपले गुणदोष यांचे आकलन करते. आपल्या हस्ताक्षरात छोटे छोटे बदल करुन कसा फायदा मिळवायचा याचे मार्गदर्शन करते.
५.आपले हस्ताक्षर, आपली सही यामध्ये केलेले अगदी साधे बदल, आपल्या स्नेहसंबंधातील कठीण प्रश्न सोडवू शकतील, मग ते वैवाहीक संबंध असोत एकमेकांशी जुळण्याचा प्रश्न असो किंवा कुटुंबियांबरोबरच्या, मित्र परिवाराबरोबरच्या संबंधातील तणाव असोत. या सर्व समस्यांवर ग्रॅफालॉजीच्या माध्यमातून आपण नक्कीच मार्ग काढू शकतो.
६.हस्तलिखानातून आपला स्वभाव, गुण, दोष व्यक्त होत असतात, असे हस्तलेखनतज्ज्ञ मानतात.बऱ्याच प्रश्नांची उत्तरे केवळ आपले हस्ताक्षर व सही  याचा अभ्यास करुन मिळतात. तुमच्या सहीत तुमच्या आत्मविश्वासाची पातळी,नातेसंबंधामधला ओलावा, तुमच्या कल्पनाशक्तीची झेप, तुमची निर्णय घेण्याची पध्दत,  तुमच्या मनाच्या कोप-यात दडून बसलेले वेगवेगळ्या प्रकारचे न्यूनगंड,  भीती या सर्व गोष्टींचे प्रतिबिंब स्वच्छ आणि स्पष्ट दिसतं.

सही आणि स्वभाव
.
तुमची सही तुमच्या पर्सनॅलिटीचा आरसा असतो. सही ही व्यक्तीची खरी ओळख असते.त्यावरुन व्यक्तीचा स्वभाव ओळखता येतो सहीच्या पाच सहा अक्षरांतून एखाद्याचा स्वभाव संदर्भातले आडाखे नक्की बांधता येतात. त्यासाठी या काही टिप्स..

1.  ज्या व्यक्तींची सही छोटी असते, अशा व्यक्तींमध्ये आत्मविश्वास कमी असतो असे समजावे.
2.  अनेकांना आपल्या सहीचे अप्रूप असते काही जण तर सतत आपल्या सहीचा सराव करीत असतात अश्या व्यक्तींमध्ये अहंपणा अधिक असतो .आपल्याशिवाय इतर कोणीही ज्ञानी नाही अशी त्यांची धारणा असते.
3.  अनेकांना आपल्या सहीमध्ये गोलाकार काढण्याची सवय असते अशा व्यक्ती आपल्या निर्णयावर ठाम असतात.
4.  काही व्यक्ती आपल्या नावाऐवजी आडनाव अधिक गडद करण्याचा प्रयत्न करतात अशा  व्यक्तींना आपल्या कुटुंबाचा गर्व असतो. आपण कुठल्या कुटुंबात जन्माला आलो हे दाखवण्याचा त्यांचा अट्टहास असल्याचे दिसून येते.
5.  काही व्यक्तींना सही करताना तुटक-तुटक सही करण्याची सवय असते, अशा व्यक्ती प्रचंड एकलकोंड्या असतात.
6.   काही व्यक्तींना आपल्या सहीला गोल करण्याची सवय असते, अशा व्यक्ती इतरांचा विचार न करता, केवळ स्वार्थी वृत्तीने जगत असतात.
7.  आपल्या नावात झाड, फुले, हसरा चेहरा काढणार्‍या व्यक्ती या दुसर्‍यांना आपल्याकडे आकर्षित करण्याचा प्रयत्न करत असतात. अशा व्यक्तींचा स्वभाव भयंकर मुडी असतो.
8.  सहीच्या खाली रेष न मारणाऱ्या व्यक्तीना स्वतःला फारसे महत्व घेणे आवडत नाही , त्यांच्यामध्ये तुलनेने आत्मविश्वास कमी जाणवतो. ही माणसं स्वत:च्या पद्धतीने आयुष्य जगणारी असतात. दुसऱ्यांची लुडबूड त्यांना सहन होत नाही. एरवी स्वभावाने बरी पण थोडी स्वाथीर्ही असतात.
9.  सहीखालील वक्र रेष ही त्या व्यक्तीच्या कला रसिकतेचे प्रतिक असते !
10. सहीच्या खाली पण सही संपल्यावर असलेले टिंब व्यक्तीचा जनसंपर्क आणि मिश्कील वृत्ती दर्शविते.
11. सहीखाली दोन डॉट्स - ही माणसं रोमॅण्टिक असतात.त्यांचे खुप मित्र-मैत्रीण असतात.यांची सौंदर्यदृष्टी चांगली असते. स्वत:च्या दिसण्याबद्दल ते अतिशय जागरूक असतात. इतरांना ते सहज आकर्षित करू शकतात.एकदा घेतलेला निर्णय सहसा बदलत नाही.

12. सहीखाली एक डॉट - या लोकांना क्लासिकल आर्ट्समध्ये इण्टरेस्ट असतो. एरवी साधी आणि कूल वाटणारी ही माणसं एकदा बिनसलं, तर आयुष्यभर तुमच्याकडे बघणारही नाहीत याची खात्री.
13. ज्यांची सही वाचता येते तेवढे ते ओळखायला सोपे, जेवढी सही वाचायला कठीण तेवढे ते ओळखायला कठीण !
14. जे लोक स्वत:ची सही खालील आडवी रेष ओढताना सहीतील अक्षरांना कापतात, ते स्वतःच्या मार्गात स्वतः अडचण निर्माण करतात
15. जे लोक लांबलचक सही करतात त्यांना मुळ मुद्यावर यायला जरा वेळच लागतो!]
16. जे लोक महत्वाकांशी असतात त्यांच्या सहीला नेहमी ३० ते-४५ degree चा angle असतो.
17. जे लोक बहुतांशी नोकरी करतात किंवा नोकरीतल्या माणसाची मानसिकता जपतात त्यांच्या सह्या ह्या पसरत्या flat  असतात!
18. जे लोक पारंपारिक पद्धतीचा वडिलोपार्जित व्यवसाय करतात बहुतांशी त्यांची सहीला angle कमी असतो!
19. शिक्षकी पेशा मधील लोक सहीखाली बहुतांशी आडवी रेष न चुकता मारतात, स्वतःचे व्यक्तिमत्व दर्शविण्यासाठी!
20. जे वडिलांच्या छत्रछायेखाली पारंपारिक व्यवसाय करतात आणि वडिलांचा मान ठेवतात , त्यांच्या सही मध्ये स्वतःचे initial हे वडिलांच्या initial मध्ये झाकले जाते!
21. ज्या व्यक्तींचे लेखन पानाच्या उजव्या बाजूला झुकलेले असते. ते लोक मनाचे ऐकणारे असतात. त्यांच्या दृष्टीने भावनेला महत्त्व असते.ते भावुक असतात. त्यांचा स्वभाव कधी कधी खूप नाटकीय वाटतो. त्यांना क्षणात राग येतो आणि लगेच जातोही.
22. ज्या व्यक्तींचे लेखन पानाच्या डाव्या बाजूला झुकलेले असते. असे लोक मेंदूने विचार करतात. कोणताही निर्णय ते विचारपूर्वक घेतात. त्यांच्या लेखी भावनेला महत्त्व नसते. हे लोक फारसे संवेदनशील नसतात.
23. ज्या लोकांचे लेखन वरच्या बाजूला जाणारे असते असे लोक महत्त्वाकांशी असतात. ते नेहमी सकारात्मक दृष्टीने विचार करतात.
24. ज्या लोकांचे लिखाण खालच्या बाजूला झुकलेले असते असे लोक महत्त्वाकांक्षी नसतात. ते नेहमी नकारात्मक विचार करतात.
25. जे लोक आपल्या लिखाणात कॅपिटल अक्षरांचा जास्त वापर करतात ते इतरांवर अधिकार गाजवतात.
26. ज्यांचे अक्षर गोलाकार असते त्यांच्याकडे स्पष्टतेचा अभाव असतो. स्पष्ट बोलणे, स्पष्ट विचार यांचा त्यांच्याकडे अभाव जाणवतो.
27. काही जणांचे अक्षर खूप गुंतागुंतीचे असते. त्यातील अक्षरे एकमेकांत घुसलेली असतात. काही वेळा असे अक्षर वाचणेदेखील कठीण होते. हे लोक नेहमी कोणत्या ना कोणत्या समस्येमध्ये अडकलेले असतात.
28. ज्या लोकांचे अक्षर सरळ आणि एकसंध असते असे लिखाण सहज आणि एका कटाक्षामध्ये वाचता येते. अशा लोकांच्या विचार करण्यामध्ये, व्यवहारामध्ये एक प्रकारची स्पष्टता पाहायला मिळते. हे लोक आयुष्यात यशस्वी होतात.
29. काही लोक शब्द लिहिताना किंवा वाक्याची सुरुवात करताना पहिल्या अक्षरावर कमी दाब देतात आणि त्यांचा हा शब्द थोडा आतल्या बाजूला झुकलेला असतो. असे लोक आरंभशूर असतात.
30. ज्यांच्या लिखाणामध्ये शब्दांवर जोर आढळतो ते दृढ विचारांचे असतात.
31. काही जणांच्या लिखाणात शब्द मध्येच तुटतात. असे लोक विचारशील असतात. ते खूप विचार करणारे असतात.
32. ज्यांच्या लिखाणामध्ये खाडाखोड अधिक असते असे लोक संकटांना मागे टाकून प्रगती करणारे असतात. ते मोठय़ा मनाचे असतात. ते आपली चूक मान्य करून त्यामध्ये सुधारणा करतात. त्यामुळेच ते प्रगती करू शकतात.
33. अति बारीक अक्षर- निर्णयास विलंब ,चिकित्सा
34. मोठे अक्षर. तडजोड वृत्ती , नजीकचा विचार अधिक ,साधेपणा .
35. समयसूचकता नसणे] वेढब अक्षर,सामान्य बुद्धिमत्ता .
36. ] गोलाई अक्षर ; गोडपणा ,लाघवी पणा ,मधुर वाणी .
37. ] अक्षरावरील रेघमनावरील ताबा , पण दुसर्यावर अवलंबून राहणे.
38. अक्षरावर रेषा नसणे ; स्वतंत्र विचारशैली
39. .! खाडाखोड असलेली अक्षरे - मनाची अस्थिरता
पुसट अक्षर निराशावाद
गाठीयुक्त अक्ष निर्णयात ठामपणा!
40. मुळाक्षर गडद असणे  जीवनाकडे पाहण्याचा सकारात्मक दृष्टीकोन
41. संपूर्ण नाव सही म्हणून लिहिणं हे लोक स्वत:च्या मताशी प्रामाणिक असतात. यांची विल पॉवर खूप स्ट्राँग असते हे कुठेही अँडजस्ट होतात. शिवाय कुणाशीही जुळवून घ्यायची तयारी असते.. चांगल्या मनाचे असतात.
42. क्या आप जानते हैं धन संबंधी मामलों में आपके हस्ताक्षर भी काफी महत्वपूर्ण भूमिका निभाते हैं. यदि हस्ताक्षर सही हैं यानि ज्योतिष के अनुसार शुभ हैं तो आपको पैसों के संबंध में उन्नति प्राप्त होती है। जबकि गलत और दोषपूर्ण हस्ताक्षर करने पर पैसों की तंगी का सामना करना पड़ सकता है। पैसों की तंगी से बचने के लिए ज्योतिष शास्त्र में हस्ताक्षर के संबंध में कुछ ध्यान रखने योग्य बातें बताई गईं हैं। इन बातों को अपनाने से कुछ दिनों में धन संबंधी परेशानियों को कम किया जा सकता है। आप बहुत धन कमाते है और फिर भी बचत नहीं होती है तो अपने हस्ताक्षर(signature) के नीचे की ओर पूरी लाईन खीचें तथा उसके नीचे दो बिंदू बना दें।